Saturday, June 24, 2017

ती

माझे प्रेम,

तसा मी शादीशुदाच पण प्रेमाचा भुकेला....कॉलेज जीवनात सायकलवरून फिरणा-या मला कधी स्वप्नसुंदरी गवसलीच नाही...एके दिवशी अचानक ती परी प्रत्यक्ष नजरेस पडली...अनेक वर्षाच्या सुकलेल्या मनाला पालवी फुटली,  जीव जडला...इतका की तिचं असणं हेच जीवन झालं...तीची स्वप्न हीच माझी स्वप्न झाली, तिझं रूसणे  -माझे सॉरी म्हणणे, तुचे चिडणे - मी चूक कबुल करणे मला आवडू लागले....

तिचे फॅशनेबल राहणे, सुंदर दिसणे, मॉडर्ऩ दिसणे..माझ्याबरोबर बागडणे, लडीवाळपणे हट्ट करणे...मी ते पूर्ण करणे.....सगळंच कसं मंतरलेल...कुणाची पर्वी नाही की समाजाची तमा नाही...

मी तिच्याबरोबर असताना कधीच समाजाचा विचार केला नाही..कारण मला काही सिध्द करायचे नव्हते...तिचे असणे हाच श्वास होता..ती कधी, कुठे काय करत असेल हे मी न बोलताही सांगू शकत होतो...इतके आमचे नाते विश्वासू, परिपक्व व पारदर्शी होते..जीवनात मोहाचे प्रसंग अनेक आले...पण तीचे माझ्यावर अवलंबून असणे मला कधीच चुकीच्या मार्गीला जावू देत नव्हते..तीही तितकीच प्रामाणिक...असे प्रेमाची आठ वर्षे आनंदाने गेली...खूप प्रगती केली, चांगले विचार केले, सर्वांना मदत केली.....विचारांनी आणि अनुभवांनी समृध्द झालो....खूप वचने दिली घेतली...तीच्या साठी जगताना माझे स्वतंत्र असित्वच तिच्यात विलिन करून टाकले....तिच्या आनंदातच मीही मनापासून बहरलो... *यात कुठेही उपकराची किंवा तीला मिंद करण्याचा विचार नव्हताच* कारण तिच्याशिवाय माझे अस्तित्वच संपले होते...

माझ्याशी लग्नाचा विचार तिनंही खूप वेळा बोलून दाखवला...पण मला कधी या बंधनाची, समाजमान्यतेची गरजच वाटली नाही...खरं सांगयच तर मी तिला माझ्या सख्या पत्नीपेक्षाही जास्त प्रेम व दर्जा दिला होता...आणि आयुष्यभर तिची काळजी करण्याचा मनोमन निश्चय ही केला होता.....

पण तिच्या लग्नाच्या भावनेला एका परपुरूषाने प्रतिसाद दिला...तिलाही ते भावले....साद...प्रतिसादाचा खेळ सुरू झाला.....गुंतागुंत वाढत गेली....

पहिला प्रियकर स्तब्धच झाला....अघटित घडलेल्या प्रकाराने विस्कटून गेला....तिच्या परत येण्यासाठी तडफडू लागला....नाना परिने तिला समजावू लागला....पण तीचे मन आता रमेना...तो एकटाच...अनंत स्वप्ने विस्कटून विव्हळत राहू लागला...त्याचा दोष त्यालाच कळेना....तिचे रूड वागणे त्यास अस्वस्थ करू लागले...एकेकाळी तिची क्षणाक्षणाची बातमी सांगणारा तो...ती सध्या काय करते हे विचारू लागला....तिचे फोन व मेसेज करू नको हे सांगणे त्यासाठी मनोविश्व उध्वस्त करणारे होते...तिचे दुस-यात रमणे हे त्याच्या विचारातच कधी नव्हते.....

एकाच वेऴी तिचा वडील, मित्र, प्रियकर, मुलगा या भूमिका हसत हसत पार पाडणारा तो...तिच्या अशा वागण्यामुळे पार गोंधळून गेला....

त्यांनी एकमेकांना नेहमीच सावरले, पण आज तीचे वेगळेच विश्व निर्माण झाले..त्याचे विश्व मात्र तिच राहिली..

आज तिला त्यास भेटायला वेळचं नाही...सहज जाता जाता भेटताना बोलली की " मी चुकीच्या मार्गाला तर जाणार नाही ना याची भिती वाटते "

तिचे हे म्हणणे ऐकूण तो मात्र मुळापासून हादरला...कायम चांगले विचारांसह तिला सोबत करणारा तो...खरंच खूप दुःखी झाला.....

आणि मनोमन पुटपुटला

तुझा.......असताना.तो तुला वाईट मार्गाला कसा जावून देईल....पण गरज आहे ती विश्वास निर्माण करण्याची....समाज काय म्हणेल यापेक्षा आपली मने काय म्हणतात हे जाणण्याची...

स्वप्नात भरारी मारण्यापेक्षा जमिनीवरील घरटयाचा आधार शोधण्याची....