Monday, March 27, 2017

गुढीपाडवा प्रश्न उत्तरे

प्र. 1. गुढीपाडवा कोणत्या ऋतुत येतो.?

उत्तर. मराठी महिने 12. सुरवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र महिन्याचा महिला दिवस चैत्र प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो. वर्षाच्या 12 महिन्यांचे मिळून, प्रत्येक दोन महिन्यांचा एक असे १२ ऋतू. चैत्र महिन्यात वसंत ऋतुचे देखिल आगमन होते. निष्पर्ण झालेल्या पानांना पालवी फुटते, विविध फुले मुक्तहस्ताने रंगाचा उधळण करतात. प्राचीन मानव निसर्गपूजक असल्याने निसर्गाच्या पुर्नजन्माचे व नवचैतन्याचे स्वागत करण्यासाठी पताका/तोरणे/गुढी तर उभारत नसेल ना?

प्र. २. बांबूचा गुढीसाठी वापर शुभ का अशुभ?

बांबू हा एक गवताचा प्रकार. बांबू भारतीय उपखंडात मोठयाप्रमाणावर आढळतो. टिकाऊ व लवचिकता यामुळे तो गुढीसाठी वापरला जातो. अनेक वस्तु,प्राणी,पक्षी काही ठिकाणी शुभ तर काही ठिकाणी अशुभ मानल्या आहेत. बांबूच्या बाबतीत अशुभापेक्षा शुभ मानण्याचे प्रमाण जास्त आहे. जोपर्यंत पृथ्वी सुर्या भोवती फिरत आहे व चंद्र, सुर्य आपले स्थान सोडत नाही तोपर्यंत पृथ्वीवरील सर्व गोष्टी शुभच आहेत. मयतासाठी बांबू वापरत असल्याने काही लोक बांबूस अशुभ मानतात, तथापी मयतासाठी फुल, तांदूऴ, अत्तर, निलगिरी, कापूस, कापड, माठ इ.सर्वच वापरतात व त्या वस्तू आपण इतर दैनंदिन कामासाठी वापरताना कुठे अशुभ मानतो.. द्वारकाधीश कृष्ण,  कान्हा असताना याच बांबूच्या बासरीचा उपयोग करायचा.

प्र.३. गुढी हा शब्द संस्कृत आहे का?

या शब्दाचा उगम संस्कृत भाषेत नसून, तो देशी भाषेत व बहुजनींच्या संस्कृतीत आहे. कानडी भाषेत 'ध्वज' या अर्थी 'गुडी' हा शब्द आला असून. नाडगुडी म्हणजे राष्ट्रध्वज असा कानडी भाषेत अर्थ होतो.

प्र.४. गुढीपाडव्याचा संबंध रामाचा रावणावरील विजयाशी आहे का?

अनेक जण असा संबंध जोडतात पण त्यास आधार मिळत नाही. रामाने रावणाचा पराभव केला, परत येताना परशुराम आडवा आला त्याचा पराभव करून राम वनवासातून परत आला, राज्याभिषेक झाला तेंव्हा लोकांनी ध्वज उभारले हे खरे आहे, पण तो दिवस गुढीपाडव्याचा नव्हता..

सिध्देश्र्वर शास्त्री चित्राव यांनी 'राम' नोंदीत पुढील प्रमाणे म्हटले आहे..

" वैशाक शुक्ल पंचमी राम के चौदा वर्ष वनवास की समाप्ती एवम् उसी दिन प्रयाग मे भारद्वाज आश्रम मे आगमन. वैशाख शुक्ल षष्ठी राम एवम भरत की पुनर्भेट, वैशाख शुक्ल सप्तमी रामका राज्याभिषेक."

प्रश्न. ५ गुढी पाडवा महाराष्ट्रात कधीपासून साजरा केला जातो.?

कानडी भाषेत गुडी हा शब्द महात्मा बसवेरश्र्वरांनी एका वचनात वापरला आहे. त्याचा काळ इ.स.1105 ते 1167  असा आहे.

ओडेयरू बंदडे गुडी तोरणव कट्टी

याचा अनुवाद श्री शंकर पाटील आणि नडकुट्टी यांनी खालील प्रमाणे केला आहे.
शरणांचे आगमन होता गुढया उभारून तोरणे बांधा. ( वाचकांनी कृपया लक्षात घ्यावे गुढया व तोरणे हे दोन स्वतंत्र शब्द आले आहेत)

मराठी भाषेत गुढी हा शब्द इ.स. 13 व्या 14 व्या शतकापासून वापरला गेल्याचे आढळते.लीळाचरित्र, चोखामेळा अभंग, नामदेव अभंग, तुकाराम अभंग, ज्ञानेश्र्वरांच्या ओव्या यात गुढी शब्द वापरण्यात आले आहेत. ज्याअर्थी गुढी हा शब्द इतक्या वेळा वापरला गेला आहे त्याअर्थी या पाठीमागची संकल्पना देखिल दीर्घकाळ चालत आलेली असली पाहिजे.

प्र.६. गुढीपाडवा व शककालगणना यांचा संबंध काय?

इ.स 78 पासून 'शके' या कालगणनेस प्रारंभ झाला. भारतीय संस्कृतकोषामध्ये शालिवाहन शकाविषयी पुढील प्रमाणे माहिती मिळते.

शक कालाचा संस्थापक शक राजा कोण व तो कोठे होऊन गेला या विषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत. पुष्कळांच्या मते तो कुशाणवंशी कनिष्क असावा. हे राजे शकवंशी नसून कुशाणवंशी होते. या कालगणनेचा पुढे शक राजांनी वापर केल्यान् तिला शक असे नाव पडले असावे. शालिवाहन हे नाव इ.स.च्या १३ व्या शतकात त्याच्याशी जोडले गेले. हा शालिवाहन नेमका कोण. याविषयी मात्र अभ्यासक ठामपणे सांगताना दिसत नाहीत.तथापी तो कुंभाराचा मुलगा होता ही लोकभावना फार महत्वाची आहे.
या शक कालगणनेची सुरूवात चैत्र पाडव्या पासून होते.

प्र.,७ गुढीपाडवा व शंकर पार्वती

शिव व पार्वती यांचे महत्व वेदपूर्व काळापूर्वीपासून विख्यात आहे. सिंधू संस्कृतीतील उत्खननात पशुपती शिवाच्या व मातृदेवतेच्या मूर्ती सापडल्या आहेत..

भारतीय समाजाचा विचार करता, पार्वती व शंकर यांना आदि मातापिता मानण्याची श्रध्दा फार मोठ्या प्रमाणात आढळते.

कालीदास, तसेच अनेक प्राचीन ग्रंथांच्या आधारे आपण हे म्हणू शकतो की, या आदय दांपत्याचा विवाह चैत्र प्रतिपदेच्या( पाडवा) दिवशी निश्चित होवून तो,  त्यानंतर तीन दिवसांनी पार पडला.

या दिवसांची तयारी करताना ग्रंथात म्हटले आहे, सर्व शहरच एक कुल असल्यासारखे कामाला लागले, राजरस्त्यांच्या बाजूला चिनी रेशमी वस्त्रांचे ध्वज रांगेने उभारले होते, जागोजागी तेजाने चमकणारी तोरणे होती. सगळीकडे आनंदोत्सव होता.

(चिनशी भारताचा व्यापार प्राचीन असून,  तो ज्या रस्त्याने चालायचा त्यास सिल्क रोड म्हणत)

महाभारत ते १४ व्या शतकातील विविध ग्रथांनी वर्षारंभाच्या पहिल्या दिवशी पार्वती पूजेच्या प्रसंगी व शिवपार्वती विवाह प्रसंगी ध्वज वा ध्वजा उभारण्याची कृती सांगितलेली आहे...

यावरून एक लक्षात येते की पाडवा हा सऩ अतिपुरातन असून, तो आदय मातापित्यांच्या विवाहाच्या आनंदाचे प्रतिक आहे

आता पर्यंत आपण पाहिल की, शिव व पार्वती यांच्या विवाहाचा व चैत्र महिन्याचा निकटचा संबंध आहे. चैत्र प्रतिपदेला शिवपार्वतीचा विवाह निश्चित होवून, त्यानंतर चौथ्या दिवशी त्यांचे लग्न झाले. चैत्र शुक्लपक्षातील पहिले हे नऊ दिवस पार्वतीचे नवरात्र म्हणून साजरे केले जातात.

महत्वाचे म्हणजे याच महिन्यातील अष्टमीला पार्वतीचा जन्म झाला.

नवमीला,  सर्व योगिनिंची अधिपती म्हणून अभिषेक करण्यात आला.

पंचमीला व षष्ठीला शिवाशी संबंधित असलेले महानाग, राक्षस, यातधान वगैरेंची पूजा आहे.

अनेक धार्मिक ग्रथांत शिवपार्वती विवाहाचा व चैत्र नवरात्रातयचा विस्तृत उल्लेख आहेत.

शिवपार्वतीचा विवाह वसंत ऋतुत, चैत्र शुक्लात होणे, त्याप्रित्यर्थ पताका, तोरणे लागणे, त्याचा विवाह हा आदय विवाह असून, तुमचे आमचे व आपल्या सर्व पूर्वजांचे विवाह त्या आदयविवाहाचे अनुकरण मानने यांस फार मोठे सांस्कृतिक मोल आहे.

प्र. ८. गुढीचे स्वरूप, उलटे भांडे इ.

गुढी हा शब्द मूळ संस्कृत भाषेतला नाही. ती गुढी या अर्थी गुढी स्त्री लिंगी आहे. गुढी या शब्दाचा एक अर्थ 'ध्वज' व पताका असाही आहे यात शंका नाही. राज्याभिषेक, सण, उत्सव इतर आनंदाच्या प्रसंगी ध्वज उभारले जात..

आपल्या देशात मातृप्रधान समाजव्यवस्था आधीपासून होती व पुरूषप्रधान व्यवस्था त्यानंतर आली. स्त्रीध्वज पुरूषध्वजाच्या आधीपासून असावा,  पुरूषप्रधान व्यवस्थेने स्त्रीध्वजाचे रूपांतर पुरूषध्वजात केले असावे. 'नमुची' नावाच्या दानवाची स्त्रीसेना असल्याचा उल्लेख वैदिक वाड्·मयात आढळतो. स्त्री सेनेचा ध्वज स्त्रीवस्त्राचाच असण्याची शक्यता अधिक आहे.

गुढीवर पालथा तांब्या हे मानवी मस्तकाचे प्रतिक हे बहुतेकांचे मत बरोबर आहे. गुढी ही साडी, चोळी इ.प्रकारच्या स्त्रीवस्त्रांनी विभूषित असते. आता गुढी हा स्त्री लिंगी शब्द, अंगावर स्त्री वेष, अशा स्थितीत या स्त्री देहावरील मस्तक स्त्रीचेच असणार....

आता ही स्त्री कोण हा प्रश्न आपल्यापुढे निर्माण होतो.

चैत्र महिना व शिवपार्वती यांचा  वर नमूद केलेला संबंध बघता  हे मस्तक पार्वतीचे असावे असे अभ्यासकांना वाटते.

ज्ञानेश्र्वरांच्या दोन ओव्या पहा.

अधऊर्ध्व गुढें काढी । प्राणु नवां पेढी।
बांधोनी घाली उडी । मध्यमेमाझि।। १८.७८६
संकल्पविकल्पाचे लुगडें सांडूनि मन उघडें।
बुध्दि ही मागिलीकडे । उगी बैसे।। १८.७३७

     ज्ञानेश्र्वरांनी येथे 'गुढे' व 'लुगडे' याचा संबंध निःसंदिग्धपणे जोडला आहे., हे पहाता इ.स. च्या 12 व्या शतकात गुढी ही स्त्री वेषाने सजली जात होती. हे स्पष्ट होते. गुढी ही देवी असल्याने तिच्या अंगावर लुगडे असणे,  ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे.

महाराष्ट्रात गुढीची पूजा करून फुलांचा, मिठाईचा हार घातला जातो,  हे सर्व पार्वतीच्या गळ्यातील दागिने आहेत. गाठी 'पुतळ्या' या स्त्री दागिण्यासारख्या आहेत.

गुढीसाठी स्त्रीयांची वस्त्रे वापरणे हा स्त्रीयांचा अनादर नसून मातृसत्ताक समाजपध्दतीमध्ये स्त्रीयांना जे प्राधान्य दिले जाते त्याचे दयोतक आहे. गुढीविषयीचा आदर हा पार्वती विषयी आदर आहे. गुढीची पूजा ही पार्वतीची पूजा आहे. मातेची पूजा आहे.

सण उत्सव म्हणजे उर्जेचे नुतनीकरण

प्राचीन धर्मशास्त्रांनी, समाजशास्त्रांनी खूप चिंतन व निरीक्षण करून सणांची रचना केली.

त्याकाळी एखादया महान स्त्री वा पुरूषाने एखादी असाधारण कृती केली की पुढच्या पिढयांना अनुकरणीय आदर्श मिळे, काळाच्या ओघात तो विस्मरणात जाऊ नये म्हणून दरवर्षी त्याच तिथीस सण किंवा उत्सव साजरा करणे..

थोडक्यात गुढीपाडव्याला गुढी उभीकरण्याची प्रथा शंकर पार्वती यांच्या चारित्र्याशी जवळून निगडित आहे.

प्रश्न ९. भारतात इतरत्र गुढी उभारली जाते का?

चैत्र प्रतिपदा हा उत्सव काश्मीरमध्ये नवरेह, गुजरात मध्ये चैत्र नवरात्र, राजस्थानात गणगौर, दक्षिणेत युगादी, हिमाचलात चैत्ती,  हरियाणात थपना  मणिपूरात मीतेइ....इ प्रकारे साजरा केला जातो..

प्र. १०. गुडीपाडवा व संभाजी महाराज...

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची:  गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी हत्या करून त्यांच्या देहाची विटंबना केली. त्यांच्या शरीरात भूसा भरून अनेक शहरात फिरवून मराठयांच्या स्वाभिमानी, रणझुंजार छत्रपतींची विटंबना केली. त्या वर्षी कुठेही गुढी उभारली गेली नाही. आपल्या घरी ही आपल्या जवळचे आप्त वारल्यास एक वर्ष आपण कोणतेही सण साजरे करत नाही. मराठयांनी याच औरंगजेबाला याच मातीत गाडून छत्रपती संभाजी महाराज हत्येचा बदला घेतला व महाराष्ट्र मोगली पाशातून मुक्त केला.

मला व्यक्तीशः असे वाटते की छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस ११ मार्च आहे तो शौर्य दिन, कृतज्ञता दिन स्वरूपात इंग्रजी तारखेप्रमाणे साजरा करून गुढीपाडवा तिथीप्रमाणे चैत्र प्रतिपदेस साजरा केल्यास हजारो वर्षाच्या परंपरेस व छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानास न्याय दिल्यासारखे होईल....

तथापी आपले वेगऴेमत व्यक्त करण्यास आपण स्वतंत्र आहात...

पाडव्यास मुहुर्त न बघता सुर्योदय बरोबर गुढी उभारावी व सुर्यास्तापूर्वी ती काढावी...

संदर्भ.. गुढी आणि शंकर पार्वती लेखक
डॉ.आ.ह साळुंखे तसेच इंटरनेट

श्री गिरीश प्रभाकर कु-हाडे
7798981199
Kurhadegirish@gmail.com

Wednesday, March 22, 2017

गुढीपाडवा भाग ७

गुढी

या शब्दाचा उगम संस्कृत भाषेत नसून, तो देशी भाषेत व बहुजनांच्या संस्कृतीमधील आहे. कानडी भाषेत 'ध्वज' या अर्थी 'गुडी' हा शब्द आला असून 'नाडगुडी' म्हणजे राष्ट्रध्वज असा अर्थ आला आहे

गुढीपाडव्याच्या स्वरूपाविषयी

गुढी हा शब्द व गुढी ही संकल्पना मराठी संस्कृतीत किमान १२ व्या १३ व्या शतकापासून आढळतात. गुढीचा एक अर्थ 'ध्वज' वा 'पताका' असा आहे. राजे, सेनापती यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तसेच राज्यभिषेक, सण, उत्सव इ. आनंदाचे सण साजरे करण्यासाठी ध्वज उभारले जात.

राम रावणाला मारून अयोध्येत परतला तो दिवस गुढी पाडव्याचा नव्हे....

अनेक जण गुढी पाडव्याचा संबंध रामाच्या रावणावरील विजयाशी जोडतात. परंतु त्यास आधार मिळत नाही.

रामाने रावणाचा पराभव केला येताना रामास परशुराम आडवा आला, रामाने परशुरामावर विजय मिळविला, तो वनवासातून परत आला  त्याचा राज्याभिषेक झाला तेव्हा लोकांनी ध्वज उभारले हे खरे आहे, पण तो दिवस गुढीपाडव्याचा नव्हता.

सिध्देश्र्वर शास्त्री चित्राव यांनी 'राम'  नोंदीत म्हटले आहे, वैशाख शुक्ल  ५,  राम के  चौदहा वर्ष वनवास की समाप्ती, एवं उसी दिन प्रयाग मे भारद्वाज आश्रम मे आगमन,  वैशाख शुक्ल६ नंदिग्राम मे राम एवंम भरत की पुनर्भेट. वैशाख शुक्ल ७. राम का राज्याभिषेक....

गिरीश प्रभाकर कु-हाडे
7798981199
Kurhadegirish@gmail.com

Tuesday, March 21, 2017

गुढी पाडवा. भाग 6

शक व शालिवाहन शक

इसवी सन ७८ पासून ' शके ' कालगणनेचा प्रारंभ झाला. शकाची म्हणजेच नव्या वर्षाची सुरवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला होते. सौर पध्दतीच्या कालगणनेनुसार वर्षाची नोंद करण्याच्या बाबतीत भारत सरकारने 'शके' कालगणनेचा स्विकार केला.

भारतीय संस्कृतकोशामध्ये शालिवाहन शकाविषयी पुढील माहिती मिळते..

शक कालाचा संस्थापक शक राजा कोण व तो कोठे होऊन गेला, याविषयी विव्दानांत मतभेद आहेत. पुष्कळांच्या मते तो कुशाणवंशी कनिष्क असावा. हे राजे शकवंशी नसून कुशाणवंशी होते. या कालगणनेचा पुढे शक राजांनी उपयोग केल्याने तिला शक हे नाव पडले असावे..

कुशाणवंशाचा अस्त झाल्यावर उ.भारतात या कालगणनेचा हळूहळू संकोच झाला. दक्षिणेत मात्र चालुक्य राजांनी शकसंवताचा उपयोग चालू ठेवला.

शालिवाहन हे नाव इ.सनाच्या तेराव्या शतकात त्याच्याशी जोडले गेले. हा शालिवाहन नेमका कोण, याविषयी अभ्यासक काही ठामपणे सांगताना दिसत नाहीत. तथापि,  तो कुंभाराचा मुलगा होता, ही लोकधारणा खुप महत्वाची आहे.

जाता जाता--शक हे परकीय व आक्रमक असताना त्यांनी चालू ठेवलेला  शक मानने काहींना विचित्र वाटू शकते...पण शक जरी परकीय असले तरी भारतीय समाजात इतके मिसळून गेले की त्यांना परके मानने आता शक्य नाही..

काहीही असो...भारतात दिर्घ काळपासून प्रचलित असलेल्या शकाचे नवे वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेला म्हणजे पाडव्याला सुरू होते.

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील
७७९८९८११९९
Kurhadegirish@gmail.com

Monday, March 20, 2017

गुढी पाडवा भाग. ५

पाडवा व नवरात्र

आज पर्यंत आपण पाहिल की, शिव व पार्वती यांच्या विवाहाचा व चैत्र महिन्याचा निकटचा संबंध आहे. चैत्र प्रतिपदेला शिवपार्वतीचा विवाह निश्चित होवून, त्यानंतर चौथ्या दिवशी त्यांचे लग्न झाले. चैत्र शुक्लपक्षातील पहिले हे नऊ दिवस पार्वतीचे नवरात्र म्हणून साजरे केले जातात.

महत्वाचे म्हणजे याच महिन्यातील अष्टमीला पार्वतीचा जन्म झाला.

नवमीला,  सर्व योगिनिंची अधिपती म्हणून अभिषेक करण्यात आला.

पंचमीला व षष्ठीला शिवाशी संबंधित असलेले महानाग, राक्षस, यातधान वगैरेंची पूजा आहे.

अनेक धार्मिक ग्रथांत शिवपार्वती विवाहाचा व चैत्र नवरात्रातयचा विस्तृत उल्लेख आहेत.

शिवपार्वतीचा विवाह वसंत ऋतुत, चैत्र शुक्लात होणे, त्याप्रित्यर्थ पताका, तोरणे लागणे, त्याचा विवाह हा आदय विवाह असून, तुमचे आमचे व आपल्या सर्व पूर्वजांचे विवाह त्या आदयविवाहाचे अनुकरण मानने यांस फार मोठे सांस्कृतिक मोल आहे.

क्रमशः

गिरीश प्रभाकर कु-हाडे
7798981199
Kurhadegirish@gmail.com

.

Friday, March 17, 2017

चैत्र पाडवा व शिवपार्वती भाग. ४

शिव व पार्वती यांचे महत्व वेदपूर्व काळापूर्वीपासून विख्यात आहे. सिंधू संस्कृतीतील उत्खननात पशुपती शिवाच्या व मातृदेवतेच्या मूर्ती सापडल्या आहेत..

भारतीय समाजाचा विचार करता, पार्वती व शंकर यांना आदि मातापिता मानण्याची श्रध्दा फार मोठ्या प्रमाणात आढळते.

कालीदास, तसेच अनेक प्राचीन ग्रंथांच्या आधारे आपण हे म्हणू शकतो की, या आदय दांपत्याचा विवाह चैत्र प्रतिपदेच्या( पाडवा) दिवशी निश्चित होवून तो,  त्यानंतर तीन दिवसांनी पार पडला.

या दिवसांची तयारी करताना ग्रंथात म्हटले आहे, सर्व शहरच एक कुल असल्यासारखे कामाला लागले, राजरस्त्यांच्या बाजूला चिनी रेशमी वस्त्रांचे ध्वज रांगेने उभारले होते, जागोजागी तेजाने चमकणारी तोरणे होती. सगळीकडे आनंदोत्सव होता.

(चिनशी भारताचा व्यापार प्राचीन असून,  तो ज्या रस्त्याने चालायचा त्यास सिल्क रोड म्हणत)

महाभारत ते १४ व्या शतकातील विविध ग्रथांनी वर्षारंभाच्या पहिल्या दिवशी पार्वती पूजेच्या प्रसंगी व शिवपार्वती विवाह प्रसंगी ध्वज वा ध्वजा उभारण्याची कृती सांगितलेली आहे...

यावरून एक लक्षात येते की पाडवा हा सऩ अतिपुरातन असून, तो आदय मातापित्यांच्या विवाहाच्या आनंदाचे प्रतिक आहे.

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील
७७९८९८११९९
Kurhadegirish@gmail.com

बांबूचा गुढीसाठी वापर शुभ कि अशुभ

बांबू व पाडवा

पाडव्याची गुढी उभारताना, बांबूच्या काठीचा वापर केला जातो. व्यक्ती मृत पावल्यावर  बांबूचा तिरडीसाठी वापर केला जातो, याच कारणाने बांबू अशुभ समजून वापर गुढीसाठी न करण्याचा सोशल मिडीयावरचा संदेश वाचला.

बांबू... बांबू हा एक गवताचा प्रकार, तो झुडपाने वाढतो, याची उगवण 50 अंश उत्तर अंक्षाक्षाच्या दरम्यान पूर्व आशिया, उत्तर ऑस्ट्रेलिया, हिमालय, दक्षिण भारत, आसाम इ भागात मध्यम ते अति पर्जन्य प्रदेशात होते.

शुभ-अशुभ

शुभ अशुभ हा कोत्या, सडक्या मनाचा खेळ आहे, कित्येक वेळा आपल थोबाड देखिल काही जण अशुभ मानतात, म्हणून काय आपण जीव देत नाही. क्षणभर शुभ अशुभ खर मानला तर, बाबूंच्या बाबतीत अशुभापेक्षा शुभ मानण्याचे प्रमाण जगात जास्त आहे.. चीन, जपान  इतकेच कशाला भारतात देखिल फेंगशुई थोतांडानुसार बांबूची  बाऊलमधील रोपे काही जण शुभ संकेत म्हणून घरात ठेवतात. ते जाऊ दया,  कृष्णाची बासरी पण बाबूंचीच होती. जगतगुरू तुकोबा म्हणतात वृक्ष वल्ली आम्हा सोयरे.. बांबूपासून अनेक लोकोपयोगी वस्तू तयार होतात. कोवऴ्या बांबूचा आहारात देखिल उपयोग केला जातो. असा स्मशाना पर्यंत साथ देणारा बांबू खर तर एक निर्सगाचे वरदान मानला पाहिजे ना की अशुभ वस्तु.

बांबू लवचिक असतो, वजनाने हलका असतो. मेलेल्या माणसाचे वजन उचलायला त्याच्या या गुणाचा उपयोग होतो. नाहीतर आज काल खाऊन खाऊन वजन वाढलेली असतात, त्यात परत तिरडीसाठी बांबू ऐवजी लाकड वापरली तर, खांदेक-यांना देखिल लवकरच उचलण्याची वेळ यायची, विनोदाचा भाग सोडला तर

गुढी उंच उभी केली जाते, वा-यामुऴे ती हेलकावे खाते, पण बांबूच्या हलक्या व लवचिक पणामुळे ती आपला दरारा टिकवून ठेवते, पाडव्यानंतर परत त्याच बांबूचा कपडे वाळत घालायला वापर होतो, ते वेगळच..

असा हा बहुगणू बांबू , गुढीसाठी नक्कीच लाभदायक आहे

Thursday, March 16, 2017

*हे फतवे कधी थांबणार*..


विषय- नहिद अफ्रिन या आसाम मधील १६ वर्षाच्या १० वी तील गायिकेला गाण्यापासून रोखण्यासाठी मौलवींकडून फतवा काढण्यात आला.

तुम्ही, आम्ही गाणे म्हणू शकतो का? नाही ना. कारण गायन ही एक नैसर्गिक देण आहे, कला आहे, प्रयत्न व उपजत गुण याचा एक अत्युच अविष्कार आहे.

अकबराच्या दरबारात तानसेन जेव्हा, गाणी म्हणायचा  तेंव्हा दिवे पेटायचे, पाऊस पडायचा असे म्हटले जाते. यातील अतिशयोक्तीचा भाग बाजूला केला तरी गायनाची शक्ती आपल्या लक्षात येईल. इस्लाममधीलच एक सुफी परंपरा आहे, त्यात संगीताच्या तालावर अल्लाशी तादम्य पावण्याची योजना असते, या सुफी परंपरेवर देखिल कट्टरवादयांनी पाकिस्तान हल्ला केला.

मी म्हणेल,तसाच धर्माचा अर्थ लावायचा व आम्ही सांगू तोच धर्म व तीच कृती करायची. असा कट्टरवाद भारतात चालू देणे व अशा कट्टरवादाचा निषेध न करणे म्हणजे भारताच्या सहिष्णू विचारसरणीचा पराभवच आहे..

बर हा कट्टरवाद इस्लाममध्ये वाढत असला तरी तो सर्वच धर्मात मूळ रोवतो आहे..

याचे कारण समाजातील सुशिक्षित, नेते, पुढारी, सिनेकलाकार, मिडिया यांचे मौन..

चला तर, उठा, सर्वच धर्मातील असहिष्णुते विरूध्द संघर्ष करू. तुमचा धर्म, तुमच्या घरात, देवळात, मशिदित.. रस्त्यावर व समाजात फक्त घटनेचे व मुक्त मानवतेचे राज्य निर्माण करूया.

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील

Wednesday, March 15, 2017

शिवजयंती ..१९ फेब्रुवारीलाच का?

*नक्की वाचा*
*शिवजन्मोत्सव : १९ फ़ेब्रुवारी ला च का साजरा करावा !* ?

*शिवजयंतीची सुरवात भारतात सर्वप्रथम महात्मा फ़ुलेंनी केली.त्यांनी १९ फ़ेब्रुवारी १८६९ साली पुणे येथे प्रथम शिवजयंती साजरी केली.*

*शासनाने संशोधन करून २००१ मध्ये अध्यादेश काढून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख निश्चित केली.*

या तारखेनंतर एक नवा वाद काही  मंडळींनी सुरु केला.

या मंडळींच्या मते शिवजयंती ही इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी न करता मराठी तिथीप्रमाणे करावी.

*तिथीप्रमाणे शिवजयंतीची तारीख सतत बदलत राहते.*

म्हणजे २००० साली शिवजयंती २३ मार्च ला होती तर २००१ ला १२ मार्च,२००२ ला ३१ मार्च,२००३ ला २० मार्च,२००४ ला ०९ मार्च आणि २००५ ला २८ मार्च रोजी.

*आता इथे एक प्रश्न तयार होतो तो असा की ,  सावरकर,गांधी,नेहरू अशा अनेकांची जयंती सर्वत्र  इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी होते मग विश्ववंद्य छत्रपती शिवरायांची जयंती
तिथीप्रमाणे का ?

  *हिंदुंच्या  कालगणनेनुसार शिवजयंती व्हावी असा आग्रह हे लोक धरतात. परंतु  हिंदूंची  कालगणना तरी एक  आहे का ???  तर नाही !! .*

*भारतात  विक्रम संवत व शालीवाहन शक अशा दोन  कालगणना  हिंदुंच्या आहेत.यातही बोंब अशी की   या   कालगणनेमध्ये   भारतातच  अनेक  बदल  आहेत*  .

*उदा.विक्रम संवतच्या  वर्षाची सुरुवात बंगाल व इतर प्रांतात चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे.  तर  गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात आषाढ शुद्ध प्रतिपदा आहे.तर शाहीवाहन शक महाराष्ट्रापेक्षा तामीळनाडूत एक वर्षाने  पुढे आहे .म्हणजे तामिळनाडूत  ३०० वी  शिवजयंती असेल  तर महाराष्ट्रात २९९ वी शिवजयंती असते.*

                याचा अर्थ इतकाच की *हिंदूंची म्हणून खात्रीपुर्वक सांगता येईल अशी सर्वमान्य कालगणना वापरात नाही.*

*व्यवहारात सर्व सामान्य माणसे हिंदूंची कालगणना वापरत नाहीत तर इंग्रजी कालगणना वापरतात.*

*जर तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायची म्हंटले तर मागील वर्षी किती तारखेला जयंती झाली किंवा पुढील वर्षी किती तारखेला जयंती येईल हे  पंचांगाचा आधार घेतल्याशिवाय सांगता येणार नाही.*

*आज शिवजयंती महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेरदेखील साजरी होत आहे.त्यामुळे शिवजयंती ही प्रतिवर्षी एकाच तारखेला शिस्तबद्धपणे साजरी होणे महत्वाचे आहे.*

*काहींना  मात्र शिवजयंतीच्या माधमातून स्वत:चे स्वार्थी राजकारण राबवायचे आहे म्हणून ते इंग्रजी तारखेला विरोध करत असतात.

*तिथीच्या आग्रहामुळे शिवजयंती उत्सवात एकवाक्यता राहत नाही*

ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वास हानीकारक आहे.*म्हणून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही तारीख बरोबर आहे हे सत्य स्विकारून मोठ्या प्रमाणात शिवजयंती १९ फ़ेब्रुवारी रोजीच धुमधडाक्यात साजरी केली पाहिजे.*

*पुन्हा एकदा शिवभक्तांना विनंती कि छत्रपती शिवराय यांच्या दोन जयंत्या करुन राजांची थट्टा थांबवावी.*

*छत्रपतींचा जन्मोत्सव जर जागतिक दर्जाचा बनवायचा असेल तर आपणास जगमान्य असलेल्या कॅलेंडर नुसार तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करावी लागेल.*

सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा आवाहन शिवजयंती हि तारखे प्रमाणेच करावी. 

           *शिवरायांची आठवण तर उठता बसता, चालता फिरता कायमस्वरुपी यायला हवी.पण जर एकाच दिवशी महान *शिवजन्मोत्सव करायचा असेल तर तो तारखेप्रमाणे केला पाहिजे.*

*१९ फ़ेब्रुवारी ही तारीख अवघ्या जगभरात मान्य केली असताना काही सडक्या कल्पनेने नासलेले काही लोक मात्र तिथी चा आग्रह धरतात.*

*मुळात देशातला कोणताच व्यवहार हा तिथी प्रमाणे न होत तारखे प्रमाणे होतो.शाळा, कोलेज,न्यायालये, बाजारपेठा, संसद हे सगळे तारखेप्रमाणे चालतात आणि तारीख ही जगभरात इथुन-तिथुन एकच असते.*

*म्हणजे तारखेप्रमाणे (१९ फ़ेब्रुवारी) जर शिवजयंती साजरी केली तर ती जगभरात साजरी होईल.*

*कुठल्याही व्यक्तीला शिवजयंतीची तारीख विचारली तर तो १९ फ़ेब्रुवारी ही तारीख पटकन सांगू शकेल. पण तिथी कोण सांगु शकेल काय ?

*संदर्भ  नक्की वाचाच !* *फक्त 19 फेब्रुवारी !!*
         छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनाबाबतचा वाद गेली शंभर वर्ष आहे,शिवचरित्राच्या अनेक साधनांमधून साधारणत: दोन जन्मतिथी येतात.वैशाख शके १५४९ म्हणजे एप्रिल१६२७ आणि फ़ाल्गुन शके १५५१म्हणजे फ़ेब्रुवारी १६३०.सर्वप्रथम १९०० मध्ये वि.का.राजवाडे यांनी बखरीच्या आधारे शके १५४९(१६२७) हा शक निश्चित केला.नंतर "जेधे शकावली"मिळाल्यावर शके १५५१शुक्ल संवत्सर,फ़ाल्गून वद्य त्रुतीया(१६३०) ही नवी तिथी उजेडात आली.जेधे शकावली हे मराठ्यांच्या इतिहासातील एक अस्सल साधन व अव्वल प्रतिचा ऐतिहासिक कागद मानल्याने या जन्मतिथीबद्दल विद्वानांत एकमत होऊ लागले.

             इ.स. १६२७(शके १५४९) ही जन्म तारीख पुढील साधनांच्या आधारे मानली गेली होती.[१]९१ कलमी बखर [२] मल्हार रामराव चिटणीस बखर [३] मराठी साम्राज्याची छोटी बखर [४] शिवदिग्विजय [५] श्री शिवप्रताप [६] पंत प्रतिनिधीची बखर इ.इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती अशी की,या बखरी व इतर साधने पेशवाई व उत्तर पेशवाईतील आहेत.

                इ.स.१६३०(शके १५५१) या तिथीचा आधार मुखत्वे जेधे शकावली,शिवभारत व शिवराम ज्योतिषी हा आहे.

*जेधे शकावली ही छत्रपतींच्या म्रुत्युनंतर १०-१५ वर्षांत लिहिण्यात आली आहे.शिवभारत हा काव्यग्रंथ छत्रपती शिवरायांच्या पदरी असणार्या परमानंद कवीने लिहिला आहे.तर शिवराम ज्योतिषी हा छत्रपती शिवरायांचा समकालीन होता.* यावर संशोधन करून 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे.

( संकलन - भागवतराव सोनवणे)