Wednesday, December 28, 2016
असहिष्णुता कि मानवता
Tuesday, December 27, 2016
लक्ष्मीपूजन नक्की काय आहे
कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो.
दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता.
परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत.
त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तीमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखवला आहे.
यावरून असे दिसते की, प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.
अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निऋती या नावांनीही ओळखतात..
( आजही आपल्यात सटवीपूजनाचा कार्यक्रम केला जातो )
निवृत्ती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती बहुजनांची लक्ष्मी आहे, असे देव (ब्राह्मण) मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत.
त्यामुळे मराठा समाजाने आपली नाळ कोठे आहे याचा नीट विचार करणे आवशक आहे.
संदर्भ काही भाग संजीव वेलणकर पुणे.
Monday, December 12, 2016
धर्माचा उगम व विकास भाग 2
Friday, December 9, 2016
मराठा आतातरी जागा हो
ब्राम्हणांची निर्मिती ब्रम्हाच्या मस्तकापासून झाली व क्षञियांची त्याच्या हातापासून झाली असे ब्राम्हण ग्रंथात लिहले आहे
याचा अर्थ ब्राम्हणांनी स्वतःच्या बुध्दीचा वापर करायचा तर क्षञियांनी बुध्दीचा वापर न करता फक्त घाव घालावा.
त्याचे तंतोतंत पालन, स्वतःला क्षञिय म्हणवणारे मराठे करीत आहेत.
आपले कोण, परके कोण हेच त्यांना कळेनासे झाले आहे, नोटबंदी, मोदी, राहुल गांधी कोणताही विषय असो, एकमेकाची गचंडी पकडायला तयारच.
बुध्दीचा वापर करायचाच नाही, समाजहिताच्या गोष्टी कोन सांगत असेल तर त्याची चेष्टा करायची.
धर्म म्हणजे काय याचे वाचन नाही की अभ्यास नाही. आला गुरवार, आला शनिवार की पळ या देवाला नाहीतर लाव बुवाचा बुक्का.
कोणत्या बुवाने, महाराजाने कोणते तत्वज्ञान मांडले, कोणती गुलामगिरी दूर केली, कोणती सामाजिक चळवळ उभारली ना परिक्षण ना चिकित्सा.
स्वतःचे मस्तक व बुध्दी गहान ठेवायची व भजनी लागायचे, अनवाणी वारी करायची, चटई टाकून झोपायचे, कशी समाजात सुधारणा होणार.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात
तिर्थी धोंडापाणि देव रोकडा सज्जनी.
प्रबोधनकार म्हणतात
देवळात पुजा-याचे पोट असते.
गोतम बुध्द, संत गाडगे महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, आ.ह. साळुंके यांनी कष्टकरून आपल्यापुढे ख-या धर्मीची तत्वे ठेवलि पण आपण इतके करंटे की वाचतच नाही, बरे कोण शहाणा सांगत असेल तर ऐकत नाही.
आपल कर्तुत्व शून्य, सरडयाची झेप कुंपनापर्यंत तशी आपली झेप छत्रपतींच्या जयजयकारा पर्यंतच.
पण प्रत्यक्ष विधायक कार्य करायची वेळ आली की आपण गळपटतो. मोर्चा वगैरे ठिक आहे पण तेच सर्व प्रश्नांचे उत्तर आहे का.? आरक्षण मिळून सर्व प्रश्ऩ सुटतील का? शेतीच्या समस्या दूर होतील का?
मग उपाय काय करावा
उपाय सोपा आहे.
तुम्ही देव मानता का? या प्रश्नापेक्षा माणुसपण जपता का? हा प्रश्न स्वतःला विचारा.
तुम्ही ज्या देवाला, बुवाला, महाराजाला मानता तो अवैज्ञानिक सत्य तर सांगत नाही ना.
तुमचा उध्दार करायला कोणी जन्म घेणार नाही, उगीच अवताराची वाट बघू नका. राम, कृष्ण हे ही मानवच होते फक्त त्यांनी उच्चतम मानवी मूल्य गाठले.
त्यांचा विचार व आचारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करता येतो का ते बघा.
मराठे तुम्ही आहातच जर बुध्द होता येतय का ते पहा.
अभिमानी तुम्ही आहातच जरा वाचनाचा व्यासंग धरून आंबेडकर होता येतय का ते बघा.
मस्तीमध्ये जगत आहातच पण जरा विद्रोही विचार करून म. फुले होता येतय का ते पहा.
मराठयांनो यातल काहीच नाही जमल तर निव्वळ माणूस म्हणून जगून पहा.
जग बदलेल तेव्हां बदलेल स्वतः मधला एक अवगुण बदलता येतो का ते पहा.
धर्माचा उगम व विकास
काल आपण बघितले कि पुरातन काळात वारा, अग्नी, पाऊस या निसर्गातील शक्तींची विधवंसक रूपे बघून व त्याचा कार्यकारण न समजाल्याने भयकंपित होऊन प्राचीन मानवाने याच शक्तींना देव मानण्यास सुरवात केली. या मानवाने असा कार्यकारण भाव शोधून काढला कि या शक्तींना खुश करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे.
यातून मग यज्ञ संकृती चा उगम झाला. हे यज्ञ वारा, अग्नी, पाऊस इत्यादी शक्तींना खुश करण्यासाठी सुरु करण्यात आले. याची हजारो उदाहारणे आपणास वेदां मध्ये सापडतात.
ऋग्वेद संहिता भाग १ सुक्त ३७ श्लोक ४५३
मरुतो यद्ध वो बलं अचूच्यवितन //
गिरीरचुच्यवितन
अर्थात
हे मरुता, आपण आपल्या बलांनी लोकांना विचलिता करता {घाबरवता }
पर्वतांना देखील विचलित करण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे.
आशा प्रकारे घाबरलेला मानव, या मरुताना खुश करण्यासाठी त्यांची स्तुती करतो.
ऋग्वेद संहिता भाग १ सुक्त ३७ श्लोक ४५6
अस्ति हि श्मा मदाय वः स्मसी शमा वयावेमेषम
विश्व चिदयुंर्जीवसे
अर्थात
हे मरुता आपण प्रसन्न व्हावे
Sunday, December 4, 2016
पुरोगामी विचार संवाद
संवाद व वाद यात काय फरक असावा?
संवादामुळे स्वतःचा व दुसर्याचा सन्मान, माणूसपण जपले जाते. दुसर्याचे ऐकूण घेण्याची व त्यावर विचारपूर्वक मनन, चिंतन करून निष्कर्षाप्रत येण्याची कला विकसित होते. मीपण दूर होतो.
संवादामुळे सत्याकडे वाटचाल होण्यास मदत होते. मनावरील जुन्या, कालबाहय विचारांची, निरर्थक क्रियांची जळमटे दूर होतात.
संवादासाठी आवश्यक बाबी-
संवाद करणा-या व्यक्तींना अभिनिवेश नसावा, शास्त्रीय पुरावे, घटना, अभ्युपगम, प्रगल्भता व्दारे तार्किक विवेचन असावे. संवादांती मान्य होणारे निष्कर्ष मोकळेपणे स्विकारून आपले मत व मन बदलावे.