कालावधी 2००० वर्षाच्या आसपास
या आधी आपण बघितले कि पुरातन काळात वारा,
अग्नी, पाऊस या निसर्गातील
शक्तींची विधवंसक रूपे बघून व त्याचा कार्यकारणभाव न समजाल्याने भयकंपित होऊन प्राचीन मानवाने याच शक्तींना देव मानण्यास सुरवात केली. या
मानवाने असा कार्यकारण भाव शोधून काढला कि या शक्तींना खुश करण्यासाठी काहीतरी
केले पाहिजे जेणे करून या शक्ती खुष होवून आपणास संरक्षण देतील.
यातून
मग यज्ञ संकृती चा उगम झाला. हे यज्ञ वारा, अग्नी, पाऊस
इत्यादी शक्तींना खुष करण्यासाठी सुरु करण्यात आले. याची हजारो उदाहारणे
आपणास वेदां मध्ये सापडतात.
ऋग्वेद
संहिता भाग १ सुक्त ३७ श्लोक ४५३
मरुतो
यद्ध वो बलं अचूच्यवितन //
गिरीरचुच्यवितन
अर्थात
हे
मरुता, आपण आपल्या बलांनी लोकांना विचलिता करता {घाबरवता
}
पर्वतांना
देखील विचलित करण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे.
आशा
प्रकारे घाबरलेला मानव, या मरुताना खुश करण्यासाठी त्यांची स्तुती करतो.
ऋग्वेद
संहिता भाग १ सुक्त ३७ श्लोक ४५6
अस्ति
हि श्मा मदाय वः स्मसी शमा वयावेमेषम
विश्व
चिदयुंर्जीवसे
अर्थात
हे
मरुता आपण प्रसन्न व्हावे म्हणून तुमच्या साठी आम्ही हविद्राव्य तयार ठेवले आहे.
आम्हाला
संपूर्ण आयुश्य,सुखद जीवन मिळण्यासाठी आम्ही तुमचे स्मरण करतो.
लेखकाचे
दोन शब्द
प्राचीन
मानवाने याच शक्तींचा कार्यकारण भाव लक्षात न आल्याने देव मानण्यास सुरवात केली.
यात त्या मानवांचा काही दोष नाही उलट त्यांच्या मुळे आज आपणास धर्माचा उगम व विकास
कसा झाला याचे ज्ञान होते. परंतु त्याच क्रिया जर आपण धर्म म्हणून निव्वळ कर्मकांड म्हणून करणार
असू तर मात्र आपण व ५००० वर्षा पूर्वीचा प्राचीन मानव यात काही फरकच राहणार नाही. निसर्गाने प्रत्येक मानवाच्या कवटीत एक मेंदू दिला आहे त्याचा वापर
प्रगल्भ होण्यासाठी आणि विचार करण्यासाठी करावा. असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.देव, महाराज, बुवा, यांच्या नादी लागून आयुष्याचा महत्वाचा वेळ वाया घालवू नका. आपल्या मध्ये असलेल्या मनुष्त्वाचा पूर्णपणे विकास होण्यासाठी कोणत्याही अस्तितवात नसलेल्या पारलोकिक शक्तीची तुम्हाला काहीही गरज नाही.
तथापि मी किती देवभक्त हे जर तुम्हाला दाखवाचे असेल तर मग देवाचे फोटो शेयर करणे, पूजा, जयंत्या, , जेवणावळी इत्यादी गोष्टींची काही कमी नाही. चालुद्या तुमचा वर्षानुवर्षे गुलामीची परंपरा.
संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गाडगेमहाराज काय सांगून गेले, या पेक्षा आपले ज्ञान खूपच अगाध आहे त्यामुळे न बोललेलेच बरे
No comments:
Post a Comment