Friday, December 9, 2016

धर्माचा उगम व विकास


काल आपण बघितले कि पुरातन काळात वारा, अग्नी, पाऊस या निसर्गातील शक्तींची विधवंसक रूपे बघून व त्याचा कार्यकारण न समजाल्याने भयकंपित होऊन प्राचीन मानवाने याच शक्तींना देव मानण्यास सुरवात केली. या मानवाने असा कार्यकारण भाव शोधून काढला कि या शक्तींना खुश करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे.

यातून मग यज्ञ संकृती चा उगम झाला. हे यज्ञ वारा, अग्नी, पाऊस इत्यादी शक्तींना खुश करण्यासाठी सुरु करण्यात आले.  याची हजारो उदाहारणे आपणास वेदां मध्ये सापडतात.

ऋग्वेद संहिता भाग १ सुक्त ३७ श्लोक ४५३
मरुतो यद्ध वो बलं अचूच्यवितन //
गिरीरचुच्यवितन

अर्थात

हे मरुता, आपण आपल्या बलांनी लोकांना विचलिता करता  {घाबरवता }
पर्वतांना देखील विचलित करण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे.

आशा प्रकारे घाबरलेला मानव, या मरुताना खुश करण्यासाठी त्यांची स्तुती करतो.

ऋग्वेद संहिता भाग १ सुक्त ३७ श्लोक ४५6

अस्ति हि श्मा मदाय वः स्मसी शमा वयावेमेषम
विश्व चिदयुंर्जीवसे

अर्थात

हे मरुता आपण प्रसन्न व्हावे

No comments:

Post a Comment