Saturday, December 3, 2016

पुरोगामी विचार विद्रोह

विद्रोही विचारधारा हा पुरोगामी चळवळीचा प्राण आहे.


विद्रोही विचार म्हणजे नेमके काय या  बाबत थोडे विवेचन

विद्रोह म्हणजे थोडक्यात बंड. प्रस्थापित समाजरचना, विचार, धारणा, समज या विरुद्ध पुकारलेला वैचारिक लढा. माणूस हा जन्मजातच विद्रोही असतो तथापि आई वडील, समाज यांसकडून वेळोवेळी संस्काराच्या नावाखाली म्हणून जे काही केल जाते त्यामुळे त्याची वैचारिक पातळीवर कुचंबना होते व तो प्रश्न विच्रारण्याचे सोडून पूर्वापार चालत आलेले विचार, आचारच खरे मानू लागतो, तेथेच त्याचा प्रगतीचा मार्ग खंडित होतो व तो कितीही पुस्तकी पंडित झाला तरी तो वेठबिगारी सोडायला तयार होत नाही.  


विद्रोही विचार करणारे समाजात फार थोडे लोक असतात जसे श्री कृष्ण, महावीर, बुद्ध, चार्वाक, संतश्रेष्ठ तुकाराम, शिवाजी महाराज, ग्यालिलिओ,  महात्मा गांधी, महात्मा फूले, आंबेडकर, दाभोळकर, पानसरे , हमीद दलवाई इत्यादी.

परंतु याच लोकांमुळे समाजास वैचारिक दिशा मिळते, लढण्याची जिद्द निर्माण होते यातूनच पुन्हा महापुरुष निर्माण होतात.

आता आपणास विचार करण्याची वेळ आली आहे कि आपणास आपल्या मुलांना नक्की की बनवायचे  आहे. घाण्याचे बैल का वैचारिक गुलामगिरी लाथाडनारे लंबे रेस के घोडे. 


No comments:

Post a Comment