Sunday, December 4, 2016

पुरोगामी विचार संवाद

संवाद  व वाद यात काय फरक असावा?

संवादामुळे स्वतःचा व दुसर्याचा सन्मान, माणूसपण जपले जाते. दुसर्याचे ऐकूण घेण्याची व त्यावर विचारपूर्वक मनन, चिंतन करून निष्कर्षाप्रत येण्याची कला विकसित होते. मीपण दूर होतो.

संवादामुळे सत्याकडे वाटचाल होण्यास मदत होते. मनावरील जुन्या, कालबाहय विचारांची, निरर्थक क्रियांची जळमटे दूर होतात.

संवादासाठी आवश्यक बाबी-

संवाद करणा-या व्यक्तींना अभिनिवेश नसावा, शास्त्रीय पुरावे, घटना, अभ्युपगम, प्रगल्भता व्दारे तार्किक विवेचन असावे. संवादांती मान्य होणारे निष्कर्ष मोकळेपणे स्विकारून आपले मत व मन बदलावे.

No comments:

Post a Comment